यावर्षी पावसानं महाराष्ट्राला हुलकावणी दिली आहे. ऋतुमानानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाऊस नसल्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षीचा उन्हाळा हा नक्कीच महाराष्ट्राला अधिक त्रासदायक ठरू शकणार आहे. पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात असतानाच आता महाराष्ट्र सरकारने नवीन अधिसूचना जारी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यातील कारखान्यांना ऊस निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. या अधिसूचनेनुसार एप्रिल 2024 पर्यंत शेतकऱ्यांना इतर राज्यांमध्ये ऊस निर्यात करता येणार नाही. सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी ही अधिसूचना काढली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना पावसानं ओढ दिल्यामुळे अस्मानी संकटाला सामोरेत जावं लागत आहेत. पण त्यात आता राज्य सरकारने दिलेल्या या आदेशामुळे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर येऊन उभे ठाकले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे येत्या हंगामात किमान 15 टक्के गाळप कमी होईल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील कारखाने 15 ऑक्टोबर पासून होण्याच्या तयारीत आहेत. जमीन लवकर मोकळी होते यासाठी शेतकरी जो कोणी ऊस घेण्यास तयार असेल त्यांना ऊस विकतात. त्यातूनच हा ऊस कर्नाटकात जातो. या गोष्टीला त्यामुळे चाप बसू शकेल. लवकर जमीन मोकळी व्हावी म्हणून ऊस लवकर विकला जातो. परंतु त्यामुळे दर्जा देखील ढसाळतो, त्यात यंदा उसाची वाढ पावसामुळे आणि खतांच्या वाढलेल्या किमती या कारणांमुळे शेतकऱ्यांनी अधिक युरियाचा वापर केला आहे त्यामुळे उसाचा दर्जा घसरणार आहे.










