मुंबई : मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. ” सगेसोयरेची अंमलबजावणी करा अन्यथा तुमचा राजकीय सुपडा साफ करू” जरांगे पाटील यांनी गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष कंबर कसून तयारी करत आहेत. दरम्यान आता मराठा आरक्षण या विषयावर देखील राज्य सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल अशी परिस्थिती मनोज जरांगे पाटील निर्माण करत आहेत. मनोज जरांगे पाटील हे देखील महाराष्ट्र दौरा करत असून 9०० एकरावर सभा घेणार आहेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ” क्रांति 300 ते 350 वर्षानंतर येते आमच्या जीवावर जे बसले त्यांनी जरा लाज धरली पाहिजे. समाजाने अनेक वर्ष संघर्ष केलाय हे सरकारनही लक्षात घ्यावं. नाहीतर राजकीय सुखडा साफ केल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. घराघरातले लेखक मोठे करायचे असतील तर घराच्या बाहेर पडावे लागेल. तुम्हाला राजकारण करायचं ते करा त्याचं काही देणं घेणं नाही. माझा उद्देश माझ्या समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे एवढाच आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.