मुंबई : छत्रपती शिवराय यांचे नाव आणि त्यांच्या अस्तित्वाशी निगडित असलेली ती प्रत्येक वस्तू म्हणजे मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणूस जिवंत आहे यास कारण महाराजांचा प्रतापच आहे. अफजलखानाचा वध महाराजांनी केला. त्याचा कोथळा ज्या धारदार वाघनखांनी त्यांनी बाहेर काढला ती वाघनख सध्या ब्रिटनमध्ये आहेत आणि लवकरच ती आता परत या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नातून वाघनख महाराष्ट्रात परत येणार आहेत. जानेवारी महिन्यातच खरंतर ही वाघनखं महाराष्ट्रात आणता येतील अशी तयारी होती. परंतु सध्या ब्रिटन सरकार ही वाघनख महाराष्ट्रात परत पाठवण्यासाठी प्रक्रिया करत आहेत. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिल ते मी महिन्यामध्ये हे वाघनख महाराष्ट्रात परत येणार आहेत.

सध्या ही वाघनख व्हीकटोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयामध्ये आहेत. एप्रिल ते मे महिन्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखन महाराष्ट्रात परत आणू असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
