बीड : सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. यावेळी त्या म्हणाल की, ” युट्युब उघडलं की पंकजा मुंडे पडणार असे येत आहे. पण मला ही निवडणूक अवघड नाही असं देखील त्या आत्मविश्वासाने म्हणाल्या आहेत.
बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की, ” मला कुठलेही कपट कारस्थान न करता मतदान करा. मी जात कधीही काढणार नाही. ठिगळं लाऊन संसार करण्याची ताकत स्त्रीमध्ये असते. मी फेडणाऱ्या पैकी नाही, मी स्त्री आहे. मला शिवणं माहीत आहे. तुमचे मतदान मी कर्ज समजेन. व्याजासकट परत करेन.” असा आश्वासन त्यांनी बीडकरांना दिल.
आताची लोकसभा निवडणूक ही उज्वल भविष्याची आहे. शांत मनाने विचार करून मत द्या. विधानसभा निवडणूक पुढे आहे. ही निवडणूक संसदेची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा. आपल्या बीडमध्ये मी सर्वात मोठं कॅन्सर रुग्णालय उभं करणार आहे. मी आपल्या जिल्ह्यासाठी उद्योग आणणार आहे. लोकांचे प्रेम आणि विश्वास माझ्यावर आहे. सुरेश धस हे माझ्यासोबत सदैव आहेत. माझा विजय निश्चित आहे. अस त्या म्हणाल्या आहेत.
CM Eknath Shinde : ” बारामतीत परिवर्तन होणार ! आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे..! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बारामतीकरांना आवाहन
२009 ला मुंडे साहेब निवडणुकीला उभे होते. तेव्हा मी एक न एक गाव फिरले आहे. 2014 ला सुरेश धस आमच्याविरोधात राष्ट्रवादीकडून उभे होते. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमाणेच प्रीतम ताई यांची हट्रिक व्हावी अशी माझी ईछा होती. सध्याचे राजकारण डायनॅमिक झाले आहे. दोन दिवसात काहीही बदल होत आहेत. मी मागितले नाही तरीही मला उमेदवारी मिळाली, हे ईश्वराचे दायित्व आहे. मी पालकमंत्री झाल्यावर जिल्हा परिषदेमध्ये सात सदस्य सुरेश धस यांनी दिले. जिल्हा परिषद ताब्यात घेतली. मुंडे साहेब गेल्यामुळे प्रीतम ताई राजकारणात आल्या. आताचा उमेदवार मी आहे. मी उमेदवार म्हणून पसंत आहे का ? मग बदलून घ्यायचा का? असं पंकजा मुंडे भर सभेत म्हणाल्या आहेत.