मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. हा फटका नेमका का बसला याची कारण देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी पाच जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली. त्यानंतर त्यांनी आपल्याला पदमुक्त करावे अशी मागणी देखील केली. या मागणीनंतर भाजप आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षातून त्यांना विनंतीपूर्वक विरोध झाला आहे. महायुतीला जी काही हार महाराष्ट्रात पहावी लागली त्याला महायुतीतील सर्व प्रमुख आणि घटक पक्ष जबाबदार आहे. असंच सर्व नेत्यांनी म्हटल आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीवर आता भाजप पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं असतानाच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती मिळते आहे. तरी या चर्चेनंतर आता फडणवीस हे दिल्लीला रवाना होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे एकंदरीतच या चर्चा आणि भेटीगाठीतून नेमका काय निर्णय होतो हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
https://www.facebook.com/share/v/sUbLQS6uskzAA9A3/?mibextid=qi2Omg
महाराष्ट्रात अनपेक्षित रित्या भाजपला मोठा फटका सहन करावा लागला. काही जागा वगळता अमरावती, जालना, अहमदनगर, बीड या जागांबाबत भाजप आणि उमेदवारांना प्रचंड आत्मचिंतनाची गरज आहे. दरम्यान पराभूत होण्याची चव चाखलेल्यांनी याबाबत आता नेमकी आपल्यावर हार पत्करण्याची वेळ का आली याचा अभ्यास करणे आवश्यक असतानाच मराठा आरक्षण Maratha Reservation, धनगर आरक्षण Dhangar Reservation, शेती प्रश्न Agriculture question हे प्रमुख कारण असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकीकडे महायुतीला देवेंद्र फडणवीसांसारख्या नेत्यांना देखील पदमुक्त करण्याची मागणीपर्यंत वेळ गेली असली तरी दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदीची पालवी फुटली आहे.