मुंबई : महाराष्ट्रमध्ये लोकसभा निवडणुका जाहीर होताच अनेक मोठमोठ्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे म्हणाले की, ” राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार चार जून नंतर भाजपमध्ये येणार ! विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यासमोर अलामपल्लीमध्ये महायुतीच्या सभेदरम्यान केल आहे.
आत्राम यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चार जून नंतर म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन उलथापालथ सुरू असताना आता विजय वडेट्टीवार हे देखील भाजपच्या वाटेवर खरंच चालणार का ? अशा चर्चेला उधाण आले आहे. यावर अद्याप विजय वडेट्टीवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.