बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही आंदोलकांनी राज्यात काही ठिकाणी प्रचंड नुकसान केले. या आंदोलना दरम्यान बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांची घरं अक्षरशः पेटवून देण्यात आली होती. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीला देखील आग लावण्यात आली होती. सुमारे 11 कोटींची वसुली आरोपींकडून करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येतेय आहे. त्यामुळे आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे.
हे वाचलेत का ? पुणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; पुणे, पिंपरी-चिंवडमध्ये आता दर सोमवारी “No Horn Day.” !
बीड शहर आणि माजलगावमध्ये झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपींकडून केली जाणार असून तसा अहवाल देखील तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल अशी माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
हे वाचलेत का ? Elections : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना बीड पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर, 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.