नवी दिल्ली : आजची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. निवडणुकीच वेळापत्रक नुकतंच निवडणूक आयोगाने Election Commission जाहीर केल आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं असून 27 फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर 29 फेब्रुवारीला निकाल घोषित केला जाणार आहे.
राज्यसभेतील सतरा राज्यातील 56 सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल 2024 मध्ये पूर्ण होतो आहे. दरम्यान या 56 पैकी सहा सदस्य यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांचे भवितव्य आता गुलदस्त्यात असणार आहे.
महाराष्ट्रातील या 6 खासदारांचा कार्यकाळ संपणार
- खासदार प्रकाश जावडेकर (भाजप)
- केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे (भाजप)
- खासदार कुमार केतकर
- खासदार अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
- खासदार श्री. व्ही. मुरलीधरन
- खासदार वंदना चव्हाण (राष्ट्रवादी)
दरम्यान महाराष्ट्रातील राजकारणातील उलथापालथ पाहता या सहा खासदारांचं भवितव्य काय असेल हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. दिनांक 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 16 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार. 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. 29 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत- जांभळ्या (Violet) रंगाची स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचे तसेच, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबतचेही त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
मोठी बातमी : येत्या 7 दिवसात देशात CAA लागू होणार ! केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा खळबळजनक दावा; नेमका काय आहे CAA कायदा, वाचा सविस्तर