मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचाराला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज संजय राऊत यांनी नाशिक मधील घोटाळ्याप्रकरणी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात येत्या दोन दिवसात पुराव्यासहित स्पष्टीकरण देणार असे वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक मधील शिंदे फडणवीस भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. येत्या दोन दिवसात मी घोटाळ्याचे पुरावे सादर करत मोठा स्फोट करणार असं वक्तव्य त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून केले आहे. या पोस्ट नंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आपल्या एक्स अकाउंट वरून त्यांनी पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरण : स्वप्ना पाटकरांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप; नीलम गोऱ्हे बनल्या ढाल, यावेळी निशाणा थेट उद्धव ठाकरेंवर, कोण आहे स्वप्ना पाटकर ?
तसेच, ” नाशिक महानगरपालिका हद्दीत ८०० कोटींचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन. तो पर्यंत लाभार्थींनी शांत झोपावे, ” असा झोप उडवून टाकणारा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
एकंदरीतच आता नाशिकमधील हे भूसंपादन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ? शिंदे फडणवीस सरकारने यामध्ये नेमका किती रुपयांचा घोटाळा केला आहे. यावर पुराव्यासहित संजय राऊत स्पष्टीकरण देणार आहेत. असं त्यांनी म्हटल आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसात संजय राऊत कोणते पुरावे सादर करतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.