वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पार पडते आहे. आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहेत.
आजच्या या प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभंगाने सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ” चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती या सभेला उपस्थित सर्व बंधू-भगिनींना माझा जय गुरु अशा शब्दात पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, “ही भूमी, अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीच्या महासंगमची भूमी आहे. इथे अप्रतिम बलिदानांवर वसलेले आष्ठी गावची प्रेरणा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, लालूजी महाराज, संत मायबाई, आडकूजी महाराज असे अनेक किती अगणित महान संतांचे आशीर्वाद या भूमीत मिळतात. मी आज भाग्यशाली आहे की, या भूमीवर मला या सर्व पुण्य आतम्यांना प्रणाम करण्याची संधी मिळाली. आज चैत्र एकादशीदेखील आहे. पंढरपूरची आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी अशा चार यात्रा महत्त्वाच्या असतात. यापैकी आज चैत्र एकादशीची यात्रा आहे. आज प्रत्येक दिशेला गुंजत आहे, रुप पाहतां लोचनीं, सुख जालें वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा पुण्यपर्वकाळात भगवान श्री विठ्ठलांच्या चरणी मी शतश: नमन करतो”, असे आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले आहेत.
Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन VIDEO
तसेच ते म्हणाले कि , “मी गुजरातमध्ये जन्माला आलोय. त्यामुळे स्वभाविक आहे, वर्धा आणि अमरावतीशी एक वेगळं नातं असतं. पुज्य बापू गुजराच्या भूमीवर जन्माला आले आणि वर्धा त्यांची कर्मभूमी राहिलेली आहे. विनोबा भावे हे देखील बडोद्यात बरेच वर्ष राहिल्यानंतर इथे वर्ध्यात आले होते. 2024 ची ही निवडणूक विकसित भारत, आत्मनिर्भर भारतच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न देशाच्या स्वातंत्र्याआधी बापूंनी पाहिलं होतं. त्यामुळे देश ज्या दिशेला निर्णायक पाऊल उचलायला जात आहे, त्यामध्ये वर्धाचा विशेष आशीर्वाद पाहिजे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.