कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी महाअधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट शब्दात कडाडून टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेमका पक्ष का सोडावा लागला ? नारायण राणे, राज ठाकरे यांनी पक्ष का सोडला ? यावर थेट वक्तव्य केलं असून उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा आरसा पहावा असा खोचक तोला देखील लगावला आहे.
आज कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधताना अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ते म्हणाले की, नारायण राणे , राज ठाकरे यांचा तुम्हाला काय त्रास होता. एखादा चांगलं भाषण करायला लागला की त्याचं भाषण कट करू लागले. दोन-चार टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. आपली लोक मोठी होत होती हे तुम्हाला नको होतं. एकमेकांना झुंजवत होते. शिवसेनेसाठी अनेक शिवसैनिकांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि हे आले आयत्या पिठावर रेगोट्य मारायला. त्या रेगोट्या मारायला पण नीट आल्या नाहीत. अशी घनाघाती टीका देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कोकणातील राजकीय वातावरण ढवळले; चिपळूणमध्ये राणे आणि ठाकरे गटामध्ये राडा; आमदार वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ
तसेच, ” काँग्रेसला लांब ठेवायला बाळासाहेब बोलले होते. पण त्यांनी तर काँग्रेसला मांडीवर घेऊन बसले. शिवसेना वाचवण्यासाठी हे धाडस आम्ही केलं शिवसैनिकांच खच्चीकरण होऊ लागलं. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं. मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी कधीही कोणते पद मागितले नाही असं देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत.