मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच प्रमाण वाढल आहे. दरम्यान धोकादायक म्हणजे यात काही शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. याचा अधिक अभ्यास झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचं प्रेशर, सकाळी लवकर उठून शाळेत जाण्याचा प्रेशर अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला आहे. यासाठी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नऊ नंतर शाळेची वेळ ठेवण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. परंतु यावर आता शालेय बस चालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
नेमका विरोध का ?
हा विरोध केवळ मुंबई आणि ठाणे परिसरातील बस चालकांनी केला आहे. सकाळी आठ नंतर शहरी भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. शाळा कार्यालय यांची वेळ एक झाल्याने आणि सुमारे 80 टक्के विद्यार्थी हे शाळेत ये जा करण्यासाठी बस, व्यायाम आणि रिक्षाचा वापर करतात. अशा वाहतूक कोंडीमध्ये बराच वेळ अडकून राहणे आणि बस चालवणे देखील अवघड असल्याने पाचवी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्याच्या निर्णयाला बस चालकांनी विरोध दर्शवला आहे.

दरम्यान राज्य शासनाने आपला निर्णय बदलला नाही किंवा आपल्या निर्णयावर सक्ती केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील बस चालक संघटनांनी दिला आहे. त्यामुळे यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.