मुंबई : लोकसभा निवडणुकीचा Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर देशात प्रचार जोरदार सुरु आहे. या लोकसभा निवडणूका 5 टप्यात होत असून पहिल्या 2 टप्यातील निवडणूक पार पडल्या आहेत. महाराष्ट्रातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये तोफा थंडावल्या आहेत. एकूण 48 लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रात असून आता उर्वरित 35 मतदारसंघात निवडणूक पार पादडणार आहेत.
दरम्यान राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर ,
- नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16,
- जळगाव – 20,
- रावेर – 29,
- जालना – 35,
- औरंगाबाद – 44,
- मावळ – 35,
- पुणे – 42,
- शिरूर – 35,
- अहमदनगर – 36,
- शिर्डी – 22
- बीड लोकसभा मतदारसंघात 55
- असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.