जालना : मराठा आरक्षणासाठीचा Maratha Reservation लढा हा खरंतर अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. तर ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू शकते. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयावर जरांगे पाटील समाधानी नाहीत.
जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही मागितलं नसतानाही बळबळच दहा टक्के आरक्षण दिल आहे. आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे आपलं आंदोलन लवकरच जाहीर करणार आहे. आमचा आंदोलन करण्याचा हक्क कोर्टाने देखील मान्य केला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवूनच देणार या आपल्या मागणीवर मनोज जरांगे अद्यापही ठाम आहेत.
https://www.facebook.com/emahatalks/videos/1067704261158648
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अमळनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे त्यांच्यावर एसआयटी चौकशी देखील करण्यात येणार आहे. त्यांच्या आंदोलनाबाबत ही एसआयटी चौकशी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या संकटात एकीकडे वाढ होणार अशी चिन्ह असतानाच अद्याप देखील जरांगे पाटील यांनी आपला निर्णय बदललेला नाही. ते म्हणाले की, ” मी सरकारच्या विरोधात नाही . सरकार काही माझं शत्रू नाही. माझ्या बांधवांना न्याय मिळेपर्यंत मी लढाई सुरूच ठेवणार आहे. सगेसोयरे अध्यादेश तुम्ही काढलात ना ? मग त्याची अंमलबजावणी करणं सरकारचं काम आहे. असे यावेळी जरांगे पाटील म्हणाले आहेत.