सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून अध्याप देखील तिढा सुटलेला नाही प्रत्यक्षात ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे Udhav Thackrey गटाला जागा वाटपात मिळाली आहे यावर आता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे परंतु यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजीत पाटील हे आक्रमक झाले आहेत.
काय म्हणाले विश्वजीत पाटील
सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना आमदार विश्वजीत कदम पुणे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आम्हाला सर्वांनाच आदर आहे. ज्या संघर्षातून ते लढाई लढत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात आदर आणखी वाढला आहे. पण सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी मांडत आहे. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पतंगराव कदम यांनी हा बालेकिल्ला मजबूत ठेवला. एकेकाळी नऊ पैकी सहा आमदार काँग्रेसचे चिन्ह घेऊन निवडून आले आहेत. त्यामुळे आजही काँग्रेसला वातावरण चांगले आहे. सांगलीच्या जागेसाठी माझा हट्ट आणि आग्रह आहे. त्याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी तातडीने निर्णय जाहीर करावा असं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.
साखर उत्पादकांसाठी चांगली बातमी : इथेनॉल निर्मितीवरची बंदी केंद्र सरकारने हटवली, वाचा सविस्तर
संजय राऊत काय म्हणाले
विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडीने फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की , ” विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजू शकतो. ते काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. मात्र काही वर्षापासून सांगलीत जातीयवादी शक्ती वाढू लागल्या आहेत. विधानसभेला मिरजेत संघाचा माणूस निवडून येतो आणि दंगे घडवले जातात. हे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना माहीत आहे. गेल्या दहा वर्षापासून सांगलीत भाजपचे खासदार निवडून येत आहेत. त्यांचा सामना करायचा असेल तर ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. ” असं संजय राऊत म्हणाले आहेत.