मुंबई : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पेच होता तो जागा वाटपाचा, मुंबईतील दोन जागांवर आतापर्यंत उमेदवार नेमका कोणता द्यायचा यावर महायुतीत निर्णय होत नव्हता. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मोठा डाव खेळला आहे. महिन्याभरापर्यंत उद्धव ठाकरेंचे खास असलेले रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून रवींद्र वायकर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता कीर्तीकर विरुद्ध वायकर अशी लढत उत्तर पश्चिम मुंबईतून पाहायला मिळणार आहे.

रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे खास होते. सुरुवातीला त्यांनी एकनाथ शिंदेंनी बंड केल्यावर उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. परंतु काही दिवसांपूर्वी रवींद्र वायकर यांच्यावर मोठमोठे आरोप सुरू झाले. 19 बंगल्यांचा घोटाळा आणि उद्धव ठाकरेंच्या अनेक घोटाळ्यांमध्ये रवींद्र वायकरांचे नाव ईडीने गोवल. आणि महिन्याभरापूर्वीच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता एकनाथ शिंदे वायकरांनाच थेट उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.