नवी दिल्ली : मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक मोठी घटना घडली आहे. ज्या घटनेचे पडसाद काही दिवसात पडू शकतात. अर्थात राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर पुढे काय ठरले याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहेत.
मंगळवारी मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट महायुतीमध्ये सामील होऊन निवडणूक लढवायची याबाबत होती. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्रात रंगली आहे.
अमित शहा यांच्या बैठकीनंतर काय घडलं ?
दरम्यान राज ठाकरे हे मुंबईत परत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मनसेच्या सर्व महत्त्वाच्या नेते पदाधिकारी यांच्याशी देखील राज ठाकरे यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे देखील समजतंय. त्यामुळे एकंदरीतच राज ठाकरे हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सामील होणार अशी चर्चा जोर धरते आहे.