मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले आहे. खरं तर हे ट्विट करताना पुढे असे काही होईल, असं त्यांच्या ध्यानीमनी देखील आलं नसणार आहे. झालं असं होतं की, अमिताभ बच्चन हे दक्षिण मुंबईहून घरी जात असताना त्यांनी कोस्टल रोडचा वापर केला होता. आणि या कोस्टल रोडवरून मरीन ड्राईव्ह ते जुहू असा प्रवास त्यांनी अवघ्या 30 मिनिटात केला. यावर खुश होऊन त्यांनी एक अकाउंट वर लिहिले की, वाह ! क्या बात है ! साफ सुथरी, नयी बढिया सडक कोई रुकावट नही.. !
या ट्वीट नंतर भाजपने लगेच एक ट्विट केले. ज्यामध्ये भाजपने अमिताभ बच्चन यांचे थेट आभार मानले आणि लिहिले की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मुंबईचा प्रवास वेगवान होत आहे. पण नेमकं भाजपने कोस्टल रोडचं घेतलेलं श्रेय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना रुचलं नाही आणि त्यांनी भाजपच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर एक ट्विट करून भाजपला खडे बोल सुनावले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये कोस्टलरोडची पाहणी, भूमिपूजन करताना उद्धव ठाकरे दिसत आहेत. कॅप्शनमध्ये आदित्य ठाकरे यांनी लिहिल आहे की, ” उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचं काम किती वेगाने सुरू होतं. भाजपच यात काही योगदान नाही. ” असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
एकंदरीतच स्वतः अमिताभ बच्चन यांना देखील वाटलं नसेल की त्यांच्या एका साध्या ट्विट मुळे राजकारणामध्ये एवढे वादळ निर्माण होऊ शकेल. आता श्रेय वादावरून भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये सुरू झाले आहे.