मुंबई : सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत संशयास्पद झाले आहे. कोण कुठल्या पक्षातून कधी बाहेर पडेल आणि कोणाशी हात मिळवणी करेल हे सांगणं फार कठीण झालं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी एक मोठा गौप्य स्फोट केला. ते म्हणाले की, अजित पवारांसोबत गेलेले ते 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना आमदार रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील. अजित पवार गटाला एक आमदार एकत्रित करतोय. दहा ते बारा आमदार भाजपच्या चिन्हावर लढायचं म्हणत आहेत. तर उरलेले 22 आमदार हे वेगळी भूमिका घेतील. त्यांचं म्हणणं असेल की शरद पवारांसोबत चला, मग त्यांच्या पक्षात कोण राहील ? असं रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Lok Sabha Elections : बीड मतदारसंघाची यावेळी पंकजा मुंडेंना उमेदवारी ? पण पंकजाताई स्पष्टच म्हणाल्या, ” काही झालं तरी बहिणीला बाजूला करून मी पुढे जाणार नाही.! “
महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील, रोहित पवारांचे भाकित
येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील. तर महायुतीला 18 ते 20 जागा मिळतील असं भाकीत रोहित पवार यांनी केल आहे. ते म्हणाले की, अमित शहा, नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात यावं लागतं कारण त्यांना लोकांची भीती आहे. बारामतीची जनता ही पवारांच्या आणि त्यांच्या विचारांच्या पाठीशी राहील बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल हे जनताच ठरवेल. असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.