मुंबई : एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांची एका व्हिडिओ क्लीप चांगलीच व्हायरल होतं आहे. भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे बाहेर काढणारे किरीट सोमय्या सध्या त्यांच्या एका व्हिडिओमुळे (Kirit Somaiya Viral Video) जोरदार चर्चेत आहे. इतरांची पोलखोल करणाऱ्या किरीट सोममयांची स्वतःची पोलखोल झाली असल्याचं दिसून येत आहे. परंतु पावसाठी अधिवेशन सुरू असतानाच हा व्हिडिओ का व्हायरल झाला, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यावर अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
एखाद्या मायमाऊलीच शोषण होतंय का? – सुषमा अंधारे
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओनुसार एखाद्या मायमाऊलीच शोषण होतंय का? जर काही शोषण केलं जातं असेल तर ते फार गंभीर आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. असीम सरोदे म्हणाले की, संमतीने असेल तर तो विषय सोडून द्यावा परंतु, कोणाचं शोषण होतं असेल तर अशा बाबिंची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. माझ्याकडे एक दोन वेळा अशाप्रकारच्या महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. आपण वारंवार विचार करतो की, कोणाच्याही कमरेखालच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला नको. परंतु असे प्रकरण येत राहतात. हा व्हिडिओ आत्ताच का समोर यावा. या व्हिडिओमध्ये 100 टक्के सत्यता असेल. परंतु हा व्हिडिओ आत्ताच समोर येतोय याचा अर्थ असा की, अधिवेशनाच्या काळात पक्ष फोडाफोडीचे एकूण राजकारण सुरू आहे. आमदार खरेदी विक्रीचे राजकारण सुरू आहे. भाजपची नकारात्मक चर्चा चालू आहे. तसेच भाजपा वाटेल ते प्रकरण जिरून टाकत आहे.
माझ्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आहेत – अंबादास दानवे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की , भाजपाचे किरीट सोमय्या अनेक प्रकरणात ईडीकडे जातात. त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या तक्रारी केल्या आहेत. ईडी यांच्या तालावर नाचतेय असं देखील आम्ही ऐकतोय. किरीट सोमय्या यांना नैतिकता आणि परंपरेच भान नाही. भाजपा भारतीय संस्कृती, हिंदुत्वाची संस्कृती यावर मोठमोठी भाषणं करतात आणि त्याच पक्ष्याच्या नेत्याचा असा व्हिडिओ समोर येतोय. अंबादास दानवे पुढे म्हणाले की, त्यांच्याकडे याबाबत अनेक महिलांच्या तक्रारी आहेत.
भाजपने महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय – नाना पटोले
काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, खरंतर भाजपने महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचं चरित्र हरण करणं, भय दाखवणं, ईडीची भीती दाखवणं, CBI ची भीती दाखवणं, कारवाई करणं, आशा पद्धतीचं वातावरण 2014 पासून महाराष्ट्रात सुरू झालंय. जे स्वतः दुसऱ्यांना आग लावायला गेले ते स्वतःच आगीमध्ये पडले अशी परिस्थिती भाजपची झालीये. आपण पाहतोय की, सरकारने एक अफलातून जीआर काढलायं. आज महाराष्ट्रामध्ये ५० ते ६० हजार शिक्षकांची पदं खाली आहे. कित्तेक शाळा ओसाड पडलेल्या आहे. सरकार म्हणतं आहे की, आम्ही रिटायर शिक्षकांना नोकरी देऊ पण तरूणांना नोकऱ्या देणार नाही. यामुळे तरूण पुण्यात आंदोलन करत आहेत.
पुरुषांना चारित्र्य नसतं का? – अयोध्या पौळ पाटील
ठाकरे गटाच्या सोशल मीडियाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील म्हणाल्या, जर कुठलीही लोकप्रतिनिधी असेल तर आपल्याला आपलं चारित्र्य सांभाळणं फार गरजेचं असतं. स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण नेहमी महिलांवरती बोलत असतो. मग काय पुरुषांना चारित्र्य नसतं का? पुरुषांना आश्लिल गोष्टी करण्यासाठी त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं का? असा एक प्रश्न निर्माण होतो. तसेच आपण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्याचं प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा ते सांभाळायला पाहिजे. लोकांना जेव्हा आपण उपदेश करतो किंवा प्रबोधन करत असतो तेव्हा आपण त्यांच्याकडे एक बोट दाखवतो, तेव्हा लोकांनी 4 बोट दाखवायला नको. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपची ही एक प्रवृत्ती आहे. सोशल मीडियावर अतिशय घाणेरड्या भाषेत लिहिलं जातं. याआधी देखील भाजपच्या कितीतरी लोकांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. परभणीचे सुभाष कदम यांचा सुद्धा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता, तरीही भाजपनं त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाहीये. आता चित्रा वाघ यावर काही बोलतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणारे, अशी प्रतिक्रिया अयोध्या पौळ पाटील यांनी दिलीये.