• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 24, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Devendra Fadnavis यांनी ‘त्या’ दोन घटनांचा ‘बदला’ घेतला?

Web Team by Web Team
July 4, 2023
in महाराष्ट्र
0
Devendra Fadnavis Maharashtra Politics

Devendra Fadnavis Maharashtra Politics

14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात दोन मोठे बंड होतात आणि तेही मोठ्या पक्षात. बरं, यामागे ‘महाशक्ती’ म्हणून भारतीय जनता पक्ष आहे हे आता सर्वश्रुत आहेच. परंतु हे दोन्ही बंड यशस्वी करण्यामागे खरे सूत्रधार कोण असेल तर ते भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, हेही तितकंच खरं. (Devendra Fadnavis mastermind behind Shivsena and NCP split) 2022 मध्ये शिवसेना आणि 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्ष फोडून राजकिय भूकंप घडवणाऱ्या फडणवीसांनी आता खऱ्या अर्थाने त्यांचा ‘बदला’ पुर्ण केल्याचं बोललं जातंय. पण हा ‘बदला’ नेमका कशाचा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तो कसा पुर्ण केला, हे सविस्तर पुढे पाहुयात.

महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर २ घटना घडल्या ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बॅकफूटवर जावं लागलं होतं. त्यापैकी पहिली घटना होती भाजप-शिवसेनेची युती तुटणं आणि महाविकास आघाडी सरकारची स्थापना.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीला महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष महत्त्व होतं. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर एकत्र आलेल्या या दोन राजकिय पक्षांनी 1995 आणि 2014 अशी दोन वेळा राज्यात सत्ता मिळवली. मात्र ही युती 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तुटली आणि राज्याच्या राजकारणात वादळ उठलं. खरंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्री पदावरून ही युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वातील भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी शिवसेना त्यांनी वर्षानुवर्षे विरोध केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली. फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. विधानसभेत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधात बसावं लागलं होतं.

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पुढे 25 वर्षे टिकेल असा दावा काही नेते करत होते. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शांतपणे पावलं टाकत शिवसेनेला आणि परिणामी महविकास आघाडीच्या सरकारला खिंडार पाडायचं काम सुरू ठेवलं. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. उद्धव ठाकरेंच्या हातातून केवळ सत्ताच गेली नाही तर शिवसेना पक्ष देखील एकनाथ शिंदे यांनी मिळवला.

2019 ला उद्धव ठाकरेंनी युती तोडल्याचा आणि सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधात बसावं लागल्याचा हा ‘बदला’ होता असं बोललं जातं. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय विश्वातला आतापर्यंतचा अनुभव पाहता त्यांनी अगदी शांतपणे खेळी खेळली, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

पहाटेचा शपथविधी आणि राष्ट्रवादीची खेळी

2019 ला मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरुन भाजप-शिवसेना युती तुटली. त्यानंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार बनवण्याची तयारी सुरु होती. याचवेळी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये देखील एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी बोलणी सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट ही महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसाठीच होती, असा दावा अनेकांकडून केला जातो.

पडद्यामागे अशा सगळ्या घडामोडी घडत असताना अचानक एक दिवस सकाळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणुन अजित पवार यांनी शपथ घेतली. पहाटेचा शपथविधी म्हणुन हा सोहळा सर्वांच्या लक्षात राहिला. मात्र हे सरकार केवळ अडीच दिवस टिकलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपला या सरकारला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. अजित दादांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार देखील एक-एक करुन परत शरद पवारांकडे पोचले. त्यामुळे हे सरकार कोसळलं. देवेंद्र फडणवीस यांना बॅकफुटवर नेणारी ही दुसरी घटना होती.

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं. फडणवीस यांनी आपलं राजकीय कौशल्य पणाला लावून ते सरकार पाडलं खरं पण राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी बोलणी करुन नंतर अडीत दिवसात सरकार पडल्याची दुःख त्यांच्या मनात कायम होतं असं बोललं जातं.

याचाच वचपा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राष्ट्रवादीच्या सर्वात मोठ्या नेत्याला आपल्या जाळ्यात ओढलं आणि पक्षात उभी फूट पाडली. इतकंच नव्हे तर शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादी पक्षावर देखील बंडखोर नेत्यांनी आता दावा ठोकला आहे. उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना हिसकावली गेली तशीच शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी काढून घेतली जाणार का हे येत्या काळातच समजेल.

खरंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या सोबतीने राज्यातील सरकारकडे बहुमतापेक्षा जास्त आकडा आहे. मात्र तरीही अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारमध्ये सामील करुन घेण्यामागे शरद पवार आणि राष्ट्रवादीने २०१९ मध्ये दिलेला दगा कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे देखील वाचा :

Ajit Pawar vs Shinde Shivsena : शिंदे गटाला राष्ट्रवादीची अडचण? अजित पवार व शिवसेनेचं जमणार का?

Maharashtra Political Crisis : शरद पवार Vs अजित पवार ; पाहा राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याचा कोणाला पाठिंबा

Previous Post

गुरूपौर्णिमा स्पेशल : महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांचे ‘हे’ आहेत ‘पॉलिटिकल गुरू’

Next Post

Maharashtra Politics : राजकीय विषय टाळणाऱ्या मराठी कलाकारांनी अजित पवारांच्या बंडावर दिली प्रतिक्रिया

Next Post
marathi artist on maharashtra political crisis

Maharashtra Politics : राजकीय विषय टाळणाऱ्या मराठी कलाकारांनी अजित पवारांच्या बंडावर दिली प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Biparjoy Cyclone

Biparjoy Latest Update : येत्या 24 तासात Biparjoy चक्रीवादळ घालणार धुमाकूळ ! आयएमडीने दिला इशारा

2 years ago
Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

1 year ago
Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती सभेदरम्यानच खालावली; ताप आणि अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती सभेदरम्यानच खालावली; ताप आणि अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल, VIDEO

2 years ago
LIFE STYLE : मनातले बोलायला कोणी नसेल तर मानसिक आरोग्यासाठी डायरी लिहिणे हा आहे सर्वोत्तम पर्याय !

LIFE STYLE : मनातले बोलायला कोणी नसेल तर मानसिक आरोग्यासाठी डायरी लिहिणे हा आहे सर्वोत्तम पर्याय !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.