जालना : जालन्यात ब्राह्मण समाजाने Brahmin society आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण Hunger strike सुरु केले आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांनसाठी वसतिगृहाची स्थापना करावी यासह इतर मागण्यासाठी जालन्यात समस्त ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.
जालना शहरातील महात्मा गांधी चौकात ब्राम्हण समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून, महाराष्ट्र सरकारने तातडीने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी दीपक रणवरे हे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील 15 वर्षांपासून ब्राम्हण समाजाने आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन सरकारकडे मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र तरी सरकारने याबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने जालन्यात गांधी चमन परिसरात ब्राम्हण समाजाचे दीपक रणवरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलीय.
हे वाचलेत का ? ‘BHARAT PAY’ विरोधात ‘त्या’ वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड
सरकारकडून ब्राह्मण समाजाला दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप करत ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी स्वतंत्र अभ्यास गट करावा आणि इतर समाजाप्रमाणे ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
कोणत्या आहेत प्रमुख मागण्या !
- ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे.
- ब्राह्मण समाजातील आर्थीक मागास घटकातील तरुणांना व्यवसायीक मदतीसाठी परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटीची तरतुद करण्यात यावी.
- ब्राह्मण समाजातील विद्याथ्र्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारावे / स्थापन करण्यात यावे.
- ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5 हजार रुपये मानधन देवुन त्यांची विविध मंदीरात नियुक्ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदिरात नित्यपुजा लावली जावी.
- ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग-2मधुन वर्ग-1वर्गात बदल करण्यात याव्यात त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा.
- ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करुन सामाजिक विडंबनातून मुक्ता करण्यात यावी.
- परंपरागत राज्यातील मंदीरे ज्यात्या पुर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत करण्यात यावी जेणे करून मंदीराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थीतीत अबाधीत राहील.
- ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थीक व शैक्षणीक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची-आयोगाची शासनस्तरावर नेमणुक करण्यात यावी.