• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

Air India: टाटा एअरलाईन्सच्या एअर इंडिया या नामकरणाला 29 जुलै रोजी 77 वर्षे पूर्ण; वाचा सविस्तर लेख

Web Team by Web Team
July 29, 2023
in देश-विदेश
0
tata airlines to air India
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

AIR INDIA: कोरोनाच्या काळात देश संकटात असताना एका उद्योग समूहाने देशासाठी तब्बल १५०० कोटी रुपये दान करत असल्याची घोषणा केली. हा उद्योग समूह दुसरा तिसरा कोणाी नसून मोठ्या आदराचं स्थान कमावलेला टाटा उद्योग समूह होता याची आपण सर्वांना कल्पना आहे.रतन टाटा यांच्या मालकीचा असलेला टाटा उद्योग समूह देशातील बलाढ्य उद्योगसमूह म्हणून ओळखला जातो. अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या टाटा उद्योग समूहाच्या ( TATA GROUP ) टाटा एअरलाईन्सच्या (TATA AIR LINES) एअर इंडिया(Air India) या नामकरणाला २९ जुलै रोजी ७७ वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने ‘महाटॅक्स’चा टाटा एअरलाईन्स ते एअर इंडियाचा प्रवास सांगणारा हा खास लेख.

एअर इंडियाची ( AIR INDIA) स्थापना आणि प्रारंभीचा काळ

१९३२ साली टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने एअर इंडियाची सुरवात झाली. कालांतराने याचे नामकरण टाटा एअरलाईन्स असे झाले. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल वाहून नेण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल विमानातून वाहून नेले. हे विमान मद्रासला गेलं, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Nevill Vintcent हे होते. जे आर डी टाटा यांच्यासोबत त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. प्रारंभीच्या काळात कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवेला प्राधान्य दिले,कराची आणि मद्रास दरम्यान आणि पुढे अहमदाबाद आणि मुंबई मार्गे ही सेवा प्रदान केली जात होती.

पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाणाचा महत्वपूर्ण टप्पा पार केला. याकाळात पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा कंपनीने मिळवला.

असं झालं नामकरण….

१९३८ साली कंपनीचे नाव बदलून’टाटा एअर लाईन्स’ असे करण्यात आले. दिल्ली आणि कोलंबो या शहरांना जोडणारी विमानसेवा याच काळात सुरू झाली. १९४६ च्या टाटा मासिक बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ‘बॉम्बे हाऊसमधील लोकप्रिय मतानुसार नाव निवडणे चांगली कल्पना होती. त्यानुसार, सर्व टाटा कर्मचार्‍यांना मतदानाची कागदपत्रे वितरीत करण्यात आली. यात इंडियन एअरलाइन्स, पॅन-इंडियन एअरलाइन्स, ट्रान्स-इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया अशा चार नावांचे पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी त्यांना त्यांची पहिली आणि दुसरी पसंती कोणती हे ठरविण्यास सांगितले. यातून ‘एअर इंडिया’ या नावाची निवड करण्यात आली.

टाटा एअरलाईन्स आणि दुसरे महायुद्ध

त्याकाळात सुरू असणाऱ्या दुसऱ्या महायुद्धा दरम्यान निर्वासितांची सुटका करणे,सैन्याची वाहतूक करणे,दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक आणि विमानांच्या देखभालीची महत्वपूर्ण जबाबदारी टाटा एअरलाईन्सनी उत्तमरीत्या पार पाडली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा हवाई वाहतूक सुरू करण्यात आली तेव्हा २९ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाईन्स पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आणि तिचं नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये टाटा एअरलाईन्सची ४९% भागीदारी भारत सरकारने विकत घेतली. १९५३ साली या कंपनीचं राष्ट्रीयीकरण झालं.

भारत सरकारने टाटा एअर लाईन्स ला विकत घेतले

१९५३ मध्ये भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली. जेआरडी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले. १९६२ साली परत एकदा कंपनीचे नाव बदलून ‘एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड’ असं करण्यात आलं. २१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनलने ताफ्यात आपले पहिले बोईंग ७०७ – ४२० समाविष्ट केले. एअर इंडिया इंटरनॅशनलने १४ मे १९६० रोजी न्यूयॉर्कला आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली.

८ जून १९६२ रोजी एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले आणि ११ जून १९६२ रोजी एअर इंडिया जगातील पहिली जेट विमान कंपनी बनली. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली. २३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली.

२०२२ मध्ये एअर इंडिया पुन्हा एकदा टाटांनी विकत घेतले

२०१७ मध्ये सरकारने एअर इंडिया विक्रीसाठी काढली. परंतु कंपनीवर कर्जाचा डोंगर असल्याने कोणत्याही गुंतवणूकदाराने स्वारस्य दाखवले नाही. परिणामी ही एअर इंडिया ची विक्री प्रक्रिया २०२२ पर्यंत बारगळली. पुढे सरकारने ३०,००० कोटी रुपये किंमत कमी करून १००% हिस्सा विक्रीस काढला. स्पाईस जेटच्या अजय सिंग आणि टाटा उद्योगसमूहाने बोली प्रक्रियेत भाग घेऊन अंतिमतः १८,००० कोटी रुपयांना बोली लावत टाटा उद्योगसमूहाने एअर इंडियाची मालकी मिळवली.

हे दिखील वाचा ,

उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का ?

Previous Post

Harmanpreet Kaur got suspended : भारतीय कर्णधार हरमनप्रीतवर बंदी, सामन्यात स्टंप तोडणे पडले महागात

Next Post

Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

Next Post
worlds richest Marathi man

Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

adipurush

Adipurush Movie Review : आदिपुरुष पाहून चाहत्यांची निराशा, म्हणाले – ‘चित्रपटात वापरलेली भाषा थुकरट…’

2 years ago
Ashok Chavan Resigns : ” काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिल आहे…!” अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी व्यक्त केली खंत

Ashok Chavan Resigns : ” काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिल आहे…!” अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी व्यक्त केली खंत

1 year ago
मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

2 years ago
धार्मिक पर्यटन स्थळ तुळजापूर : सर्वांना विश्वासात घेवूनच तुळजापूरचा विकास आराखडा अंतिम होणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

धार्मिक पर्यटन स्थळ तुळजापूर : सर्वांना विश्वासात घेवूनच तुळजापूरचा विकास आराखडा अंतिम होणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.