मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. परंतु यानंतर केवळ महायुतीने त्यांच्या निर्णयाचा स्वागत केलं तर त्यांच्या स्वपक्षातून देखील अनेकांनी विरोध केला तसेच राजीनामे देखील दिले आहेत. यावर राज ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांना पाठिंबा का जाहीर केला यावर स्पष्टीकरण दिल आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला. मोदी नसते तर राम मंदिर उभे राहिलं नसतं. 1992 पासूनची मागणी पूर्ण झाली. राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं हे वास्तव आहे. पहिल्या पाच वर्षात आम्हाला त्यांच्या भूमिका पटल्या नाहीत. तेव्हा टीका केली होती. टीका केली तेव्हा काय मागितलं नव्हतं, पूर्वीच्या मुद्द्यांवर टीका केली होती. महाराष्ट्र बाबतच्या मागण्या मोदींपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
Sanjay Raut : ” भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं ! गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने कोट्यावधींचा निधी घेतल्याचा संजय राऊतांचा घणाघाती आरोप
त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यावर देखील राज ठाकरे यांनी भाष्य करताना आम्ही भूमिका बदलतो म्हणतात पण आमच्या भूमिका या मुद्द्यांवर आहेत असं स्पष्ट म्हटलं आहे. त्याचबरोबर पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो. ज्यांना ही भूमिका पटत नाही ते निर्णय घ्यायला मोकळे आहेत. असं थेट वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी केल आहे.