मुंबई : सोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आमदारकीचा देखील राजीनामा पाठवला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. त्यात आता आजच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसन देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांना अनेक कठीण सवाल विचारले आहेत.
आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चान्नीथला यांनी कठोर शब्दात अशोक चव्हाण यांवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळी रमेश चान्नीथला म्हणाले की, ” एवढे भित्रे असू नये. जो सच्चा शिपाई असतो तो मैदान सोडत नाही. अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केलं ? दोन वेळा मुख्यमंत्री 14 15 वर्ष मंत्रिपद मिळालं. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, आमदारकी-खासदारकी दिली. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली याचं कारण सांगावं ? असा सवाल त्यांनी अशोक चव्हाण यांना केला आहे.
https://www.facebook.com/share/v/XcU2kmUSGAK1KTVV/?mibextid=w8EBqM
तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता माफ करणार नाही. असा हल्लाबोल भाजपवर देखील रमेश चान्नीथला यांनी चढवला आहे.
मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतात ?
यावेळी भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना रमेश यांनी त्याला म्हणाले की, ” महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या सर्व नेत्यांसोबत चर्चा केली.
काँग्रेस मधून अशोक चव्हाण सोडून कोणीही जाणार नाही. परवा दुपारी २ वाजेपर्यंत अशोक चव्हाण आमच्यासोबत बैठकीला उपस्थित होते पण आम्हला काही बोलले नाहीत. त्यांनी काँग्रेस का सोडलं? त्यांचे डे कुठलेही कारण नाही. काँग्रेसमध्ये त्यांना अनेक पदे देण्यात आलीब. मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात आलं. असे पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकार करणार नाही. अशोक चव्हाण यांनी सांगायला हवं, की त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे? काँग्रेसमध्ये काही अडचण होती का? त्यांनी कुठलंही कारण पक्ष सोडताना सांगितलं नाही.भाजप वॉशिंग मशीन आहे का? भाजपने ज्यांच्यावर आरोप केलं केले भाजपमध्ये गेले. व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळाबद्दल बोलले, मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतात.”
अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं
” आज माझी बैठक झाली, राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं. ही त्यांची जबाबदारी आहे. नांदेडचे नगसेवक आम्हाला भेटायला आले. त्यांना सुद्धा चव्हाण यांनी सांगितलं नाही पक्ष प्रवेश बद्दल. आम्ही कमजोर होणार नाही, अजून ताकदीने लढू. मी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याशी बोललो, ते सुद्धा आपल्यासोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली, आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहोत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काही फरक पडणार नाही, असं चेन्नीथला म्हणाले.