• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Sharad Pawar: राष्ट्रवादीला एकहाती सत्ता न मिळण्यामागे आहेत ‘ही’ 5 कारणे

Manasi Devkar by Manasi Devkar
August 22, 2023
in POLITICS, महाराष्ट्र
0
Sharad Pawar: राष्ट्रवादीला एकहाती सत्ता न मिळण्यामागे आहेत ‘ही’ 5 कारणे
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला कधीही एकहाती सत्ता मिळवता आली नाही, अशी चर्चा रंगली आहे. “ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, जगनमोहन रेड्डी किंवा मायावती हे सर्व स्वतःच्या जीवावर सत्ता आणून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले. पण या सगळ्यांमध्ये सर्वात उजवे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. असं असूनही राष्ट्रवादी कधी आपल्या स्वतःच्या जीवावर महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकली नाही”, असा मुद्दा शरद पवारांचे पुतणे व सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. तर आता अजित पवार गटातील दिलीप वळसे पाटील यांनी देखील तोच कित्ता गिरवला. महाराष्ट्राच्या राजकारणातील मास्टरमाइंड आणि चाणक्य अशी ओळख असलेल्या पवारांना राज्यात एकहाती सत्ता का मिळवण्यात आली नाही? यामागे असलेल्या कारणांपैकी 5 प्रमुख कारणं जाणून घेवूया.

महाराष्ट्रात भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ही प्रमुख राजकीय पक्ष मानली जातात. त्यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून हा पक्ष बराच काळ सत्तेत राहिला आहे. पण तरी राष्ट्रवादीला कधीही एकहाती सत्ता काबीज करता आली नाही, असं वारंवार म्हंटलं जातं. पक्षातील नेते सुद्धा ही खंत व्यक्त करतात. आताही मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांच्या राजकारणावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना वळसे पाटील म्हणाले, “शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 60 ते 70 आमदारांपेक्षा जास्त आमदार निवडून आले नाहीत. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, मायावती यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. पण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकदाही स्वबळावर सत्ता आली नाही”.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024

‘या’ 5 कारणांमुळे राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळवता आली नाही

वळसे पाटलांच्या या वक्तव्याने पुन्हा राजकारणात विशेषतः राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली. पण वळसे पाटलांनी सांगितलेल्या या वास्तवामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. जसं की अंतर्गत फूट, गटबाजी किंवा अजूनकाही. पण त्यापैकी 5 प्रमुख कारण आपण पाहणार आहोत. पहिलं कारण म्हणजे गेल्या काही काळापासून राज्यात प्रादेशिक पक्षांचा दबदबा वाढत चालला आहे. शिवसेना, मनसे, बहुजन विकास आघाडी, शेकाप यांसारख्या पक्षांचा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किंवा जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. शिवाय राज्यात भाजप आणि कॉंग्रेससारखी दोन मोठी राष्ट्रीय पक्ष आहेतच. त्यामुळे या स्पर्धेत राष्ट्रवादीला एकट्याने सत्ता मिळवणं कठीण बनतं.

दुसरं कारण म्हणजे मतदारवर्ग. सुरुवातीपासूनच मराठा समाज हा राष्ट्रवादीचा मतदारवर्ग असल्याचं सांगितलं जातं. राष्ट्रवादीचे बहुतांश नेतेही मराठा समाजातून येतात. शिवाय राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षता मानणारा पक्ष आहे, त्यामुळे ओबीसी, मुस्लिम आणि दलित समाजालाही पक्षातून संधी दिली जाते. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, धनंजय मुंडे ही त्यापैकीच काही उदाहरणं. मात्र सुरुवातीला हा मतदारवर्ग काँग्रेस पक्षाचा मानला जायचा. पण काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीने हा मतदारवर्ग विभागला गेला. तर आता मराठा समाज राष्ट्रवादीकडून काही अंशी दूर झाल्याचं बोललं जातं. याला कारण म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी भाजपने मराठा नेतृत्वाला दिलेली संधी आणि इतर पक्षातून अनेक मराठा नेत्यांनी भाजपात केलेला प्रवेश. त्यामुळे राष्ट्रवादीचा मूळ मतदार दुरावला, असंही सांगण्यात येतं.

तिसरं कारण म्हणजे आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर झालेले घोटाळ्याचे आरोप. शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, लवासा, तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा यासारख्या प्रकरणांमुळे राष्ट्रवादी कायमच अडचणीत आली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सुद्धा अनेकदा आरोप झाले आहेत. पक्ष नेतृत्वापासून नेत्यांपर्यंत अनेकांवर झालेल्या आरोपांमुळे जनतेत चुकीचा संदेश जातो आणि निवडणुकीवेळी त्याचा प्रत्यय येतो.

चौथं कारण म्हणजे अविश्वास. पुलोद सरकार असो किंवा हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत केलेली युती असो, यासारख्या घटनांमुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत कायमच संभ्रम निर्माण होतो. राष्ट्रवादी कधीही कोणत्याही पक्षासोबत जाऊ शकते, असं त्यांच्याविषयी बोललं जातं. पक्षाचे विचार आणि धोरणांमध्ये बदल होत गेले की कार्यकर्ते आणि जनता दोन्ही संभ्रमात जातात. तसेच पक्षावर असलेला विश्वासही कमी होतो. शिवाय कार्यकर्त्यांची पक्षावर असलेली निष्ठा सुद्धा कमी होऊ लागते. ज्यामुळे त्यांची सक्रियता कमी होते.

पाचवं कारण म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शरद पवार स्वतः. पवार महाराष्ट्रातून दिल्लीत गेले आणि तिथेच ते रमले. त्यांनी अनेकदा आपल्याला दिल्लीत राजकारणच करायचं असल्याचं सांगितलं. पण शरद पवार केंद्रात सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रातली त्यांची पकड ढिली पडत गेली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र की दिल्ली असं विचारण्यात आलं असता त्यांनी “दिल्ली सोडणार नाही” असं उत्तर दिलं. महाराष्ट्र सुरक्षित हवा असेल तर दिल्ली हातात असणं गरजेचं आहे, असं सांगणाऱ्या पवारांचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याचं अनेक जाणकार सांगतात. या 5 प्रमुख कारणांमुळेच शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळवता आली नाही, असं म्हणता येईल.

Previous Post

Chandryan 3 वर ट्विट केल्याने प्रकाश राज सोशल मीडियावर Troll

Next Post

Amit Thackeray: राज ठाकरे अमित ठाकरेंना देणार नवी संधी?

Next Post
Amit Thackeray, Raj Thackeray

Amit Thackeray: राज ठाकरे अमित ठाकरेंना देणार नवी संधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Mumbai Crime : ” अंघोळ करू नका, पाणी कपात आहे..! ” बायकोच्या बोलण्याचा राग आला म्हणून नवऱ्याने उचलले असे पाऊल; मुंबईतील विचित्र घटना

Mumbai Crime : ” अंघोळ करू नका, पाणी कपात आहे..! ” बायकोच्या बोलण्याचा राग आला म्हणून नवऱ्याने उचलले असे पाऊल; मुंबईतील विचित्र घटना

1 year ago
MPSC EXAM 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

MPSC EXAM 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

2 years ago
PUNE : जेजुरी गड विकास आराखड्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

PUNE : जेजुरी गड विकास आराखड्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

2 years ago
… तर असा आहे शाहरुख खानच्या ‘DUNKY’ चित्रपटाचा अर्थ, अखेर अभिनेत्याने दूर केला हा संभ्रम

… तर असा आहे शाहरुख खानच्या ‘DUNKY’ चित्रपटाचा अर्थ, अखेर अभिनेत्याने दूर केला हा संभ्रम

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.