प्रियंका चतुर्वेदींचा श्रीकांत शिंदेंना सल्ला, “कपाळावर लिहा मेरा बाप गद्दार है !” शितल म्हात्रेंचे प्रत्युत्तर, “बिल्ली के दात गिरे नही..!” हे नेते आहेत की बॉलीवूडचे अभिनेते ?

सध्याच राजकारण आणि राजकारणाची पातळी, राजकारण्यांची भाषा हे सगळंच नेते मंडळींनी उध्वस्त करून ठेवल आहे. कारण सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या कामकाजाविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी केली जाते आहे. खरंतर आता मतदाता देखील सावध झाला आहे.