बळीराजा सावध हो ! बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक; जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीचा धुमाकूळ

बळीराजाला आजपर्यंत आसमानी संकट कमी पडत होतं त्यामुळेच का आता बोगस बियाणांच्या विक्रीचा धुमाकूळ देखील सहन करावा लागणार आहे ? या बोगस बियाणांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस बियाणे विक्रीचा सध्या धुमाकूळ सुरू आहे.